सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

Wednesday 30 November 2016

आपला आरोग्यमित्र :भाग 2 विषय: ' मणक्याचे आजार '

मणक्याचे आजार ; कारणे  ; उपचार..... 

आजाराची लक्षणे
1हात बधिर होणे, खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत मुग्या येणे.
इत्यादी लक्षणे दिसून येतात. मणक्याचा आजार झालेल्या रुग्णामध्ये कंबरेच्या किंवा मानेच्या मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ कमी झाल्यामुळे दोन मणके हे एकमेकांवर घासल्याने मणक्याची झीज होऊन त्या ठिकाणी गॅप तयार होतो.किंवा मणक्यातील गादी घासली जाते.
त्यामुळे मुंग्या येतात किंवा दुखते
कंबरेत दुखणे,हाता  पायांना मुग्या येणे.
2> सकाळी उठताना त्रास होणे.
3> चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे.
4> पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे.
5> मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे.
6> शौचाला बसता न येणे.
7> चक्कर येणे.
मणक्याचे आजार होण्याची कारणे 
1> डोक्यावर, खांद्यावर किंवा पाठीवर जड वजनाच्या वस्तू उचलणे.
2> खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकलवरून प्रवास करणे.
3> अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बैठे काम करणे.
4> पोट साफ न होणे, सतत वेदनाशामक औषधी खाणे.
5> स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा.
6> गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे.
7> जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे उदा. वांगे, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ इ. अनेक कारणांमुळे शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे आजार उद‌्भवतात.
8> संकरीत धान्य व फवारलेले धान्य तसेच पालेभाज्या यामुळे हाडांना ठिसूळपणा येतो
मणक्यातील हाडे ठिसूळ होण्याला
अनेक कारणे आहेत. आयुर्वेदामध्ये मणक्यांच्या विकारावर अत्यंत उपयुक्त व स्थायी स्वरूपाचे पंचकर्म उपचार उपलब्ध आहेत. आयुर्वेदातील काही मूलभूत तत्त्वे अंगीकारल्यास मणक्यांचे होऊ घातलेले विकार आपण टाळू शकतो.
बरे होऊ शकतो
आयुर्वेद उपचार
1> सुरुवातीस बरेच दिवस वेदनाशामक औषधी खाऊन रुग्ण आयुर्वेदाकडे येतो. वेदनाशामक औषधींनी तात्पुरते बरे वाटते, परंतु वेदनाशामक औषधी ही काही मणक्याच्या आजाराची परिपूर्ण चिकित्सा नाही.
2> वेदनाशामक औषधी घेणे, शरीराला वजन बांधणे व ऑपरेशन करणे, हा क्रम ठरलेलाच. परंतु आयुर्वेदीय पंचकर्माद्वारे बरीच मणक्याची ऑपरेशन निश्चित टळू शकतात.
पंचकर्मामध्ये : सर्वांग स्नेहन- बॉडी मसाज
सर्वांग स्वेदन- स्टीम बाथ
यामुळे शिरा मोकळ्या होण्यास मदत होते, वात कमी होतो. स्नायूंना आलेला कठीणपणा (stiffness)
नष्ट होऊन ते लवचिक होतात.
बस्ती - वात दोषावरील प्रमुख व खात्रीशीर उपचार मणक्याच्या विकारात प्रामुख्याने तिक्तक्षिर घृत बस्ती, यापन बस्ती, मज्जा बस्ती या बस्ती प्रकारांचा अद‌्भुत लाभ होतो. नियमित वर्षातून एक वेळा वरील बस्ती घेतल्यास व्याधी पुन्हा पुन्हा होत नाही.
कटी बस्ती, मन्या बस्ती - कंबर व मान या प्रदेशी औषधी सिद्ध तेल काही काळ ठेवले जाते. या सर्व बस्ती प्रकारामुळे हाडांची झीज भरून येण्यास मदत होते. मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ तयार होण्यास मदत होते.
पत्रपोटली - या उपचारामध्ये विविध वातशामक औषधी उदा. एरंडपत्र, निर्गुडीपत्र, शिग्रुपत्र, चिंचपत्र इत्यादी पानाची पोटली करून शेक दिला जातो.
नस्य - या उपचारादरम्यान नाकामध्ये औषधी सिद्ध तूप किंवा तेल नाकात सोडले जाते. यामुळे मानेच्या मणक्यांचा गॅप भरून येण्यास मदत होते.
तसेच विविध आयुर्वेदिक उपचार, सुवर्ण कल्प, नैसर्गिक कॅल्शियम कल्प वातनाशक औषधींनी मणक्याच्या आजारावर मात केली जाऊ शकते.
पथ्यापथ्य : काय खावे / काय करावे.स्निग्ध,उष्ण असा आहार.गहू,नाचणी,उडीद,लसूण,आले,एरंड तेलाची चपाती.
योगासन :
भुजंगासन, पादपश्चिमोत्तासन, धनुरासन, सुप्तरासन, पवनमुक्तासन इत्यादी योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
प्राणायाम :
अनुलोमीलम15 मीनीट  कपालभाती 15 मीनीट
पथ्य- काय करू नये / काय खाऊ नये.वांगे,बटाटे,हरबरा डाळ,वाटाणे,चवळी,वाल,अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावीत.अति परिश्रमाची कामे टाळावीत,जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा.आंबट रसामुळे हाडांची व मणक्यातील चकत्यांची झीज लवकर होते.जड वजनाच्या वस्तू उचलू नये.आंबट पदार्थ,दही,चिंच व आम्ल रसाचे विदाही पदार्थ उदा.इडली,ढोकळा,पाव,डोसा बंद करावे.आतापर्यंत अनुभवातून अनेक रुग्णांना आॅरेशनशिवाय गुण देण्यास यश मिळाले आहे.
1)तेल व मसाजव्दारे सांध्यास व खोलवरील स्नायूस  गरम पाण्याच्या पिशवी ने शेक देणे सांध्यातील वेदना घालवणे शक्य आहे
तेल बनवण्याची पद्धत
*मोहरी तेल1000 ml
* एरंड तेल 250 ml
*तीळ तेल  250 ml
* कोरपड 500 gram
* पारीजात चे फुले व पाण 500 gram
* निर्गुडीपत्र,500 gram
* मेथी पावडर 250gram
*आेवा 100gram
*आवळा पावडर  100gram
* 10 लवंग gram
* 100 लसुन  gram
सर्व एकत्र करून
1 तास ऊकळून
घ्या थंड करून
काचेच्या बाटलीत भरुन ठेवा व
कुठल्याही सांधे दुखी व मुका मार मुचकल्यावर
चालेल 
2)गरम पाण्याच्या पिशवी ने शेक देणे
4)पुरक व्यायाम  physiotherapy
या
व्यायाम पद्धती मधे मनक्या संदर्भ व्याधीचे व्यायाम ने  स्नायूसंधींना बल प्राप्त करुन देणारी उपचार पद्धती आहे
व व्याधी परत होवु नये म्हणुन केली जाणारी उपचार व व्यायाम पद्धती आहे
5)आैषध
  #जवस 1 चमचा
  #तिळ 1चमचा
  #आवळा पावडर
  1चमचा   
#अश्वगंधा पावडर 1/2चमचा
# मेथी पावडर 1चमचारोज घ्या ☝
रोज उपाशी पोटी सकाळी �
आळीव 1 एक चमचा रात्री भिजत घाला सकाळी त्यात एक चमचा तुप एक 2 चमचे गुळ
2 चमचे तुप  इनायची
टाकुन खिर करून खा
वरील संपुर्ण उपचार पद्धतीमध्ये,रुग्णास सरासरीबरेच  दिवस उपचार  करावे लागेल,पोटातुन
औषधी साधारणतः २ ते ३ महिने घ्यावी लागतील.व्यक्ती,व्याधी व प्रकृती परत्वे उपचाराचा कालावधी बदलु शकतो.

योग्य आहार,योग्य व्यायाम व योग्य आैषधी उपचार 20 %
80% ,योग प्राणायाम व व्यायामाच्या
यांच्या सहाय्याने आपण100%
नक्कीच व्याधीमुक्त होवु शकतो
*#घरोघरी_आयुर्वेद*
*ताठ कणा हाच बाणा!!*
मानवी शरीरातील एक महत्वपूर्ण पण दुर्लक्षित अवयव म्हणजे पाठकणा होय. आपल्या संपूर्ण शरीराला तोलून धरणारा हा अवयव. मात्र त्याची कळत नकळत बरीच हेळसांड आपण करत असतो. वेडेवाकडे बसणे, बराच वेळ संगणकासमोर अवघडून बसणे, सतत पोटावर झोपणे, मऊ गाद्यांवर झोपणे, जमिनीवरील वस्तू उचलण्याकरता कंबरेतून वाकणे यांसारख्या कित्येक क्रियांद्वारे आपण मणक्याच्या दुखापतींना आमंत्रण देत असतो.
*मणक्यांची काळजी कशी घ्याल?*
- वेडेवाकडे बसणे निक्षून टाळावे. 'ताठ बस' हे शाळेपासून ऐकत आलेले आणि कधीही प्रत्यक्षात न उतरवलेले वाक्य आचरणात आणण्यास सुरुवात करावी.
- सतत संगणकासमोर बसून करायचे काम असल्यास; दर पाऊण ते एक तासाने ब्रेक घेऊन चक्क आळस दिल्याप्रमाणे आपले हात वरच्या दिशेने ताणून स्नायू मोकळे करावेत.
- मऊ मॅट्रेसचा त्याग करून कडक पण उबदार बिछान्यावर झोपणे सुरु करावे.
- खुर्चीत वगैरे बसताना आपली कंबर त्या खुर्ची वा सोफ्याच्या पाठीला टेकते आहे ना याकडे विशेष लक्ष द्यावे. नसल्यास पाठीमागे एखादी पातळ उशी घेऊन बसण्यास सुरुवात करावी.
- रोज तिळाचे तेल कोमट करून पाठीच्या कण्याला वरून खालच्या दिशेने लावावे आणि सुमारे दहा मिनिटांनी गरम पाण्याने अंघोळ करावी.
*मणक्याच्या दुखण्यावर इलाज:*
- सकाळच्या वेळी पाठीवर आडवे पडून आपले दोन्ही पाय सायकलिंग केल्याप्रमाणे हलवावेत. किंवा एक एक करून दोन्ही पायांनी हवेत सावकाश 0 हा आकडा रेखाटावा. असे केल्याने कंबरेचे स्नायू मोकळे होऊन मणक्यावरील त्यांचा ताण कमी होतो.
- आपल्या आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्ल्याने बस्ति, कटीबस्ति, षष्टीशाली पिण्डस्वेद, तैलधारा या वा तत्सम अन्य क्रिया आणि पोटातून घेण्याची आयुर्वेदीय औषधे घेण्यास सुरुवात करावी.
- आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने आहारात डिंक, खजूर, उडीद, दूध, तूप यांचा समावेश करावा. तसेच आंबवलेले पदार्थ आणि एकंदरीतच वातूळ असलेले पदार्थ खाणे टाळावे.
- आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने या त्रासावर उपयुक्त योगासने नियमितपणे करण्यास सुरुवात करावी.
मणक्यांच्या त्रासांचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. पेनकिलर आणि व्हिटॅमिन डी च्या गोळ्या हा काही यावरील इलाज नव्हे हे वेळीच लक्षात घ्या. आपल्या मणक्यांची काळजी घ्या. आयुष्यभर ताठ पाठकण्याने जगा!!
====**===**=====***=====**=**=====
माणूस हा द्विपाद प्राणी आहे. दोन्ही पायावर चालण्यामुळे शरीराचे वजन दांडाला (मणका) तोलुन धरावे लागत असल्याने मणक्यांच्या दुखण्याचा त्रास उद्भवतो प्रत्येकाला कमी-अधिक प्रमाणात हा त्रास कधी ना कधी होतोच त्यात सध्या गावोगावचे खड्डेमय रस्ते याला बरेचसे कारणीभूत ठरताहेत. त्यामुळे कंबर, पाठ, मणक्याचे दुखणे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय ठरतो आहे.
आरोग्याविषयीची काळजी, ठराविक व्यायाम यासाठी कुणाला वेळच नाही. अस्थिरोगाविषयी पूर्ण विकसित ज्ञान मिळण्याची प्रक्रिया साधारणत: दुस-या महायुद्धानंतर विकसित झाली. तर, मणक्यावरील उपचारपद्धती त्याहीनंतर पूर्णत्वाने विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे केवळ जनसामान्यांतच नव्हे तर काही वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही योग्य त्या उपचारासंबंधी अनभिज्ञता आढळून येते. या विकारांनी त्रस्त असलेला रुग्ण योग्य मार्गदर्शनापासून वंचित राहातो. याचे मूळ कारण म्हणजे रूढ असलेल्या गैरसमजुती त्या म्हणजे पुढीलप्रमाणे आहेत :
1) स्पॉँडिलायसिस हा पूर्णत: कधीच ठिक होऊ शकत नाही
2) मणक्यावरील शस्त्रक्रियांमुळे अपंगत्व येऊ शकते
3) या शस्त्रक्रियांमुळे जड काम करता येत नाही. आदी
टाळता येण्याजोगी कंबरेची दुखणी कोणती : -
चुकीच्या बसण्याच्या किंवा झोपण्याच्या पद्धतीने होणारा हा त्रास पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. उदा. सर्वात बसण्याची आरामदायी पद्धत कोणती तर उत्तर असे आहे की, लेझी बॉइज पोझ म्हणजेच एकदम कुबड काढून व एकदम ताठ बसणेही चूक, तर कार्यालयीन काम करताना साध्या लाकडाच्या खुर्चीवर एक साधारण उशी ठेवून पाय व कंबर आक्रसून न ठेवता मोकळी ठेवावी.  
झोपावे कसे  : पूर्ण सरळ वा पालथे झोपण्यापेक्षा छोटी उशी घेऊन, गुडघे थोडे दुमडून एका कडेवर निजणे हे मणक्यांसाठी सर्वात आरामदायी आहे. तसेच लाकडाच्या किंवा लोखंडाच्या कडक पलंगावर कापसाची गादी टाकून झोपावे. मात्र, निवार(खाट, बाज) असलेल्या पलंगावर नाही. जमिनीवर गादी टाकून झोपावे. आपल्या वाहनाची सीट तिरपी तर नाही याचीही खात्री करा. त्याचप्रमाणे वाहनाची नियमित तपासणी (शॉकअ‍ॅब्झॉर्बर ठिक आहेत ना) केल्यानेही कंबरेचा हा अनावश्यक त्रास टाळता येतो.
डिस्क प्रोलॅप्स किंवा स्लीप डिस्क म्हणजे काय :
आपल्या शरीरात 33 मणके असतात. त्या मणक्यांना जोडणारी गादी म्हणजे डिस्क म्हणजेच कुर्चा. या कुर्चेवर सर्व साधारणपणे माणूस उभा असतो, कुर्चेवर वजन 30 पाउंड प्रतिचौरस इंच असेअसते तर ते प्रेशर 120 पौेड प्रतिचौरस इंचाला असेल तर, माणूस समोर वाकताना ते वाढते. अर्थात समोर वाकल्यावर चौपट प्रेशर कुर्चेवर येते. या वजनाखाली ही डिस्क किं वा गादी फाटते व मागे सरकते व मज्जासंस्थेवर दाब देते. यामुळे कंबरेचा त्रास उद्भवू शकतो, मज्जारज्जू दबतो व भयंकर वेदना होतात प्रथम कंबरेत उसण भरली असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
गुडघेदुखी : कोणताही आजार होण्याआधी शरीर आपणाला काहीतरी लक्षण सांगत असते गुडघेदुखी एकदम सुरू होत नाही ती गंभीर होण्याआधी कुरबुरीचे काही संकेत मिळत असतात त्याला जाणून घेऊन त्याला योग्य तो प्रतिसाद द्यायला हवा. गुडघेदुखी चालू झाल्यावर ती अंगावर न काढता घरगुती उपाय न करता डॉक्टराकडे जावे.
वृद्धापकाळ व ठिसूळ हाडे : वृद्धापकाळात अपघात होणं म्हणजे शाप आहे. अधिक खबरदारी घेणे हा त्यावर उ:शाप आहे. या वयात मधुमेह, अस्थिरोग वगैरे आजार असल्यास शरीराची हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते. याशिवाय असणा-या आजारावरील औषधी घेत असल्याने त्याचा परिणामही हाडे कमजोर बनण्यात होतो. कॉर्टिझोन या औषधाचा परिणाम हाडांचे ठिसुळपणावर जास्त होतो. त्यामुळे हाडे मोडतातही.
हाडे ठिसूळ होण्याची इतरही कारणे आहेत : -
1) इस्ट्रोजन हार्मोन कमी प्रमाणांत उपलब्ध होणे 2) शारिरिक अशक्तता, कमजोरपणा 3) शारीरिक हालचाली कमी झाल्यास 4) कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे वगैरे 5)हाडातील पेशींची वाढ ही हळूहळू मंदावत जाते. जुन्या अस्थिपेशी बाजूच्या हाडाच्या वाढीच्या बदल्यात नष्ट पावतात व परत नव्या पेशी तयार होत नाहीत त्यामुळे हाडे विघटन पावू लागतात. हाडात चरबी साठते, ठिसूळ हाडे दाब पडल्याने खचतात त्यामुळे साध्या धक्क्यानेही पाठीच्या मणक्यातही मोडतोड होऊ शकते.

   निवडक लेख  

मणक्यांचे आजार- उपचारपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाय
डॉ. मनीष सबनीस (मेंदू व मणक्यांचे तज्ज्ञ), शब्दांकन- संपदा सोवनी
‘स्लिप डिस्क’ अर्थात मणक्यांची चकती घसरण्याच्या आजाराचे निदान झाले की त्यावर कोणते उपचार करावेत याबाबत रुग्णांच्या मनात शंका असतात. आता शस्त्रक्रियाच करावी लागेल का, ट्रॅकशन लावून काही उपयोग होईल का असे अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरेही ‘ओपीडी टू ओपीडी’ बदलतात. काही रुग्णांना व्यायामाचा सल्ला दिला जातो. काही रुग्णांना ‘ताबडतोब शस्त्रक्रिया केली नाही तर चालता येणार नाही’ अशी भीतीही घातली जाते!
ज्याला नस दाबली जाऊन मणक्याची चकती घसरण्याचा आजार झाला आहे त्याचे दुखणे प्रचंड असते. अशा रुग्णाला जर पाठ दुखण्याव्यतिरिक्त पायांत बधिरपणा जाणवत नसेल, किंवा पायांतील ताकदही कमी झालेली नसेल तर त्याने कमीत- कमी दहा दिवस शब्दश: ‘बेड रेस्ट’ घ्यायला हवी. ऑफिसला सुट्टी घेऊन घरी खाटेवर टीव्ही बघत बसणे म्हणजे बेड रेस्ट नव्हे. दिवसभर शिस्तीत विश्रांती घेऊन रात्री बसून एखादी मालिका बघू, असेही चालणार नाही! घसरलेल्या चकतीवर शरीराचे वजन पडल्यास चकतीच्या आजूबाजूला असणारे पाणी चकतीच्या फाटलेल्या आवरणातून बाहेर पडू लागते. असे होऊ नये म्हणून विश्रांतीचा उपयोग होतो. सतत काम करण्याची सवय असणाऱ्या माणसासाठी दहा दिवस झोपून राहणे अवघड आहे. पण जे रुग्ण नेट लावून ही विश्रांती घेतात त्यांना दुखण्यात लक्षणीय फरक पडलेला दिसतो.
शंभरपैकी साठ रुग्णांना केवळ दहा दिवसांच्या बेड रेस्टने निम्म्याहून अधिक आराम पडतो. असे बरे वाटू लागले की या रुग्णांना पुढे करावयाचे व्यायाम सांगितले जातात. हे व्यायाम सातत्याने आणि योग्य पद्धतीने केले असता सरासरी तीन महिन्यांत चकती घसरण्याचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणजेच साठ टक्के रुग्णांना ऑपरेशनचा ‘अ’ देखील पाहावा लागत नाही!  दुखणे कमी करण्यासाठीच्या गोळ्या घ्याव्यात की न घ्याव्यात, हादेखील रुग्णांचा नेहमीचा प्रश्न असतो. मात्र सुरूवातीच्या बेड रेस्टच्या काळात या गोळ्या घ्याव्या लागतात. दुखणे कमी करण्याची आणि सूज कमी करण्याची औषधे वेगळी असतात हे लक्षात घ्यायला हवे. उदा. काँबिफ्लॅम हे सूज कमी करण्याचे औषध आहे. चकती घसरण्याच्या आजारात सूज या घटकाचा फारसा समावेश नसतो. त्यामुळे सूज कमी करणारी औषधे या विशिष्ट आजारात उपयोगी पडत नाहीत. ही औषधे किडनीकडून शरीराबाहेर टाकली जातात. त्यांच्या दीर्घकालीन वापराने किडनीवर काही विपरित परिणाम होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे दुखण्यावर डॉक्टरांकडून ‘अ‍ॅनाल्जेसिक’ प्रकारची औषधे सुचविली जातात. ही औषधे साधारणपणे दहा- पंधरा दिवस घ्यावी लागतात. त्यानंतरही रुग्णाला दुखणे कमी करण्यासाठी औषधांची गरज भासत असेल तर त्याचा चकती घसरण्याचा आजार बेड रेस्टमुळे बरा होणाऱ्यातला नाही हे समजावे. पण म्हणून लगेच पुढचे पाऊल शस्त्रक्रियाच असेल असे नाही! गैरसमजामुळे आणि शस्त्रक्रियेच्या भीतीने असे रुग्ण आजार अंगावर काढत राहतात. चालढकलीमुळे प्रत्यक्षात आजार वाढत जाऊन पायात बधिरपणा येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. हळू- हळू पायांतील ताकदही कमी होऊ शकते. मग मात्र नाईलाजाने रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी तयार व्हावे लागते. या परिस्थितीत शस्त्रक्रिया जरी केली तरी रुग्णाच्या पायांतील आधीच खूप कमी झालेली ताकद शस्त्रक्रियेमुळे पूर्णपणे भरून येईलच याची ग्वाही देता येत नाही. ज्यांना औषधे आणि विश्रांतीने बरे वाटते त्यांच्यासाठी वेगवेगळे व्यायाम आहेत. मात्र या रुग्णांना व्यायाम नियमितपणे करावेच लागता. ‘दोन महिने व्यायाम करून बरे वाटते आहे, आता व्यायाम थांबवू’, असे म्हणून चालणार नाही. व्यायामातील अनियमितपणामुळे चकतीचा आजार पुन्हा उद्भवू शकतो. मणक्यांचे आजार म्हणजे पाठीचे व्यायाम असा सगळ्यांचा समज असतो. पण फक्त पाठीचेच स्नायू बळकट करून (पॅरास्पाईनल स्ट्रेंथनिंग) पुरत नाही. मणक्यांसाठीचे व्यायाम करताना पोटाला विसरून कसे चालेल! त्यामुळे पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठीचे ‘अबडॉमिनल स्ट्रेंथनिंग’ व्यायाम आणि पोटाच्या आत मणक्याला चिकटून असणाऱ्या स्नायूंसाठीचे ‘कोअर स्टॅबिलिटी’ व्यायामही रुग्णांना सांगितले जातात. वेगवेगळ्या गटातील स्नायूंना एकाच वेळी व्यायाम मिळाला तरच आजाराला दीर्घकालीन आराम पडू शकतो.
‘व्यायाम केल्याने आमचे दुखणे वाढते’ अशी तक्रार अनेक रुग्ण करतात. व्यायाम केल्यावर दुखणे वाढण्याचे दोन अर्थ होऊ शकतात. एकतर रुग्ण चुकीच्या पद्धतीने व्यायाम करत असेल किंवा सांगितलेले व्यायाम रुग्णाला मानवणारे नसतील. अशा वेळी वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यायामांत बदल सुचविले जातात.
====**===**=====**=====**==**
मणक्यांचे काही आजार : स्पाँडिलायटिस
   मानदुखी
मानदुखीचा आजार भारतात खूप आढळतो. मानदुखी ही मुख्यत: मानेतील मणक्यांचा आजार आहे. मणके झिजून त्यातली कूर्चा-गादी दबणे, बारीक अस्थि-गुठळया तयार होणे, यामुळे आतील चेतारज्जू आणि बाहेर पडणा-या नसांना घर्षण व इजा होणे या सर्वांचा मिळून हा आजार होतो.
कारणे
मणक्यांची झीज होणे हा यातला मुख्य दोष आहे. मणक्यांची झीज जेवढी जास्त, तेवढी लक्षणे जास्त होतात. भारतात यासाठी काही विशेष कारणे आढळतात.
डोक्यावर सतत भार वाहणारे गट - हमाल, माथाडी कामगार, रस्त्यावर खडी-दगड वाहणारे मजूर, वर्षानुवर्षे डोक्यावर पाण्याचे हंडे वाहणा-या स्त्रियांना हा आजार लवकर गाठतो.
शिवाय वयोमानाप्रमाणे मणक्यांची झीज होतच असते.
लक्षणे
-  मानदुखी, मान जड होणे, मानेत कळा येणे, कवटीच्या तळाशी मानेत दुखणे.
-  पाठीच्या फ-यांमध्ये दुखणे (कण्याच्या दोन्ही बाजूला फ-याच्या पातळीत दुखणे)
-  खांद्याच्या भागात दुखणे.
-  डोकेदुखी - मागे सुरु होऊन डोक्याच्या वर पसरते.
-  चेतातंतूंवर दबाव आल्याने पुढील लक्षणे दिसतात: पाठीचा चौकोन, खांदा, दंडाचा पुढील भाग, मनगटाचा भाग, अंगठा, इ. ठिकाणी वेदना जाणवते. हे सर्व भाग मानेच्या मणक्यातून निघणा-या चेतातंतूंशी संबंधित आहेत. या भागातले स्नायू पुढे दुबळे होत जातात. चेतातंतू हाडांच्या-गुठळयांनी दाबले-रगडले जाणे हे त्याचे कारण आहे. काही जणांना मान पुढे वाकवल्यावर विजेचा झटका हातापर्यंत चमकतो.
-  याच भागात मुंग्या येतात. टोचल्याप्रमाणे संवेदना होतात.
-  कूर्चा चेतारज्जूवर दाबल्यामुळे विशिष्ट लक्षणे दिसतात. हाता-पायात दुबळेपणा जाणवतो, शक्ती कमी होते. लघवी, गुदद्वाराचे नियंत्रण कमी होते. अर्थातच हा आजार आता जास्त झालेला असतो.
-  मणक्याजवळच्या रक्तवाहिनीवर दाब आल्याने काही लक्षणे दिसतात. यात मुख्यत: चक्कर (मेंदूकडे रक्त कमी पडल्याने) हे लक्षण असते. चक्कर तात्पुरती किंवा सतत येते. चक्कर येण्याचे आणखी एक कारण म्हणजे मानेभोवतीच्या स्नायू व पडद्यांचा सतत ताण हे असते.
रोगनिदान
वरील लक्षणांवरून रोगाची शंका घेणे शक्य आहे. पुढील निदान व सल्ल्यासाठी डॉक्टरकडे पाठवावे. मानेचा क्ष किरण फोटो काढून आजाराचे प्रमाण निश्चित करता येते. आवश्यक वाटल्यास जास्त तपासण्या कराव्या लागतील. (उदा. सीटी स्कॅन किंवा एम.आर.आय. फोटो)
उपचार
सौम्य किंवा मध्यम आजार असल्यास साध्या उपायांनी याची लक्षणे कमी होतात. (पण मूळ आजार बरा होत नाही) यासाठी
-  मानेखाली कमी रुंदीची मऊ उशी घ्यावी. यामुळे मान नेहमीपेक्षा उलटबाजूला वाकून तिला विश्रांती मिळते.
-  पुढे वाकण्याचे, मान खाली करण्याचे प्रसंग टाळावेत. काम करताना मान ताठ किंवा मागे वाकलेली चांगली. यासाठी टेबलावर काम करताना उतरती फळी वापरावी. (पूर्वीचे दिवाणजींचे मेज चांगले)
-  मानेला हलका शेक, मसाज यांचा चांगला उपयोग होतो.
-  मानेचे व्यायाम करून स्नायू बळकट करणे आणि स्नायूबंध/पट्टे ढिले करण्याने वेदना कमी होत जाते.
-  वेदनेसाठी तात्पुरत्या वेदनाशामक गोळया घ्याव्यात.
-  प्रवासात मानेचा पट्टा वापरावा. यामुळे मानेला व मणक्यांना धक्के बसत नाहीत.
-  शरीरात 'गंजरोधक' पदार्थ (ऍंटी-ऑक्सिडंट) वाढण्यासाठी चांगला ताजा आहार घ्यावा. प्राणायाम करावा.
-  तीव्र आजार असल्यास (स्नायू दुबळे होणे, खूप वेदना, शॉक प्रमाणे चमकणे, लघवी-गुदद्वारावरचे नियंत्रण कमी होणे) यासाठी शस्त्रक्रिया लागू शकेल. या शस्त्रक्रियेच्या तंत्रात आता खूपच प्रगती झाली आहे. सूक्ष्म शस्त्रक्रियातंत्राने  'दुरुस्त्या' करण्यामुळे मोठी शस्त्रक्रिया टळते. याबद्दल अर्थातच तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
धन्यवाद!!

Tuesday 29 November 2016

आपला आरोग्यमित्र ...आजचा विषय :अतिशय महत्वाची माहिती जी प्रत्येकाला ज्ञात असलीच् पाहिजे

कृपया खालील प्रमाणे दिलेली माहिती आयुष्यभर उपयोगी पडणार ती जतन करुन ठेवा       
                              ●|| शरीराला आवश्यक खनिजं ||●
Minerals we need...

🔺कॅल्शिअम
कशात असतं?
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.

🔺लोह
कशात असतं?
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.

🔺सोडिअम
कशात असतं?
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं
कमतरतेमुळे काय होतं?
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
कार्य काय असतं?
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.

🔺आयोडिन
कशात असतं?
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.
कमतरतेमुळे काय होतं?
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
कार्य काय असतं?
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.

🔺पोटॅशिअम
कशात असतं?
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
कार्य काय असतं?
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.

🔺फॉस्फरस
कशात असतं?
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.
कमतरतेमुळे काय होतं?
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
कार्य काय असतं?
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.

🔺सिलिकॉन
कशात असतं?
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,
कमतरतेमुळे काय होतं?
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
कार्य काय असतं?
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.

🔺मॅग्नेशिअम
कशात असतं?
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.
कमतरतेमुळे काय होतं?
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
कार्य काय असतं?
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.

🔺सल्फर
कशात असतं?
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.
कमतरतेमुळे काय होतं?
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
कार्य काय असतं?
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.

🔺क्लोरिन
कशात असतं?
पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.
कार्य काय असतं?
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.

🔺खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔺
» फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.
» डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.
» काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.
» दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.
» फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.
▫ब्लड प्रेशर  आणि  नियंत्रण▫
==================

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज  तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.

▫लसूण -

ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.

▫शेवगा -

यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.

▫जवस -

जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

▫विलायची -

एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शर
हळद   Turmeric

गुणधर्म  -----

तिखट,  कडवट,  रूक्ष,  गरम,  जंतुनाशक,  रक्तशुद्धीकारक,  वात,  पित्त,  कफ  शमन  करणारी.

उपयोग -----

१)  जखमेवर  किंवा  मुका  मार  लागणे.  हळद  लावा.
२)  रक्ती  मुळव्याध  -  बकरीचे  दूध  +  हळद  घ्या.
३)  सर्दी,  कफ,  खोकला -  गरम  दूध  +  तूप  +  हळद  घ्या.
४)  जास्त  लघवी  -  पांढरे  तीळ  +  गुळ  +  हळद  घ्या.
५)  आवाज़  बसणे  -  हळद  +  गुळ  गोळ्या  करून  खा.
६)  काविळ  -  ताक  +  हळद.
७)  ताप  -  गरम  दूध  +  हळद  +  काळीमिरी  पुड.
८)  लघवितून  पू  जाणे  -  आवळा  रस  +  हळद  +  मध.
९)  मुतखडा  ( स्टोन )  -   ताक  +  हळद  +  जूना  गुळ.

      #    आरोग्य   संदेश    #
    
हळदच  आहे  जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक,
नक्कीच   आजारांना    आहे   ती   मारक.
[योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर]
तोंड  येणे
 
तोंडाचे  विकार
 
कारणे -----

जागरण  करणे,  जास्त  तिखट  खाणे,  पोट  साफ  नसणे,  पित्त  होणे,  अपचन  होणे,  उष्णता  वाढणे,  रोगप्रतिकारक  शक्ति  कमी  होणे. व्यसन  करणे.

उपाय -----

१)  जेवणात  गाईचे  तूप  व  ताक  घ्या.
२)  गुलकंद  खा.
३)  ज्येष्ठमधाची  कांडी  चघळावी.
४)  दुधाची  साय  आणि  शंखजीरे  मिक्स  करून  तोंडातून  लावा.
५)  हलका  आहार  घ्या.
६)  वरील  कारणे  कमी  करा. त्रिफळा  चूर्ण  घेऊन  पोट  साफ  ठेवा.
७)  दही  उष्ण  असल्याने  जास्त  खाऊ  नका.
८)  जाईची  पाने  किंवा  तोंडलीची  पाने  किंवा  पेरूची  पाने  किंवा  उंबराची  कोवळी  कांडी  चावून  थुंका.
९)  नियमित  प्राणायाम  करा.
१०)  आवळा  पदार्थ  खा.
११)  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.

जीभेची  साले  निघत  असल्यास

उपाय -----

१)  पुदिन्याची  पाने  आणि  खडीसाखर  मिक्स  करून  चावून  थुंकत  रहा.
२)  एक  केळ  गाईच्या  दूधाबरोबर  खावे.
३)  त्रिफळाच्या  काड्याने  गुळण्या  करा. जंतुसंसर्ग  कमी  होतो.

     #     आरोग्य  संदेश     #

व्यायामानेच  पचनशक्ती  वाढवा,
तोंडाचे    सर्व   विकार    घालवा.
[योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर]
मुळव्याध     Pails

उपाय -------

१)  नारळाची  शेंडी  जाळून  राख  बनवा.
२)  ती  राख  २/३  ग्रँम  ताकातून  घ्या.
३)  रिकाम्या  पोटीच  घ्या.
४)  सकाळ  व  संध्याकाळ  घ्या.
५)  मुळा /  सुरण  भाजी  खा.
६)  अक्रोड  खाऊन  वर  दूध  प्या.
७)  जेवणात  कच्चा  कांदा  खा.
८)  श्वास  रोखू  बटरफ्लाय  व्यायाम  करा.
९)  हलका  आहार  घ्या.  गाईचे  तुप  खा.
१०)  पोट  साफ  ठेवा.
११)  नियमित  प्राणायाम  करा.
१२)  चोथायुक्त  पदार्थ  खा.
१३)  शाकाहारी  राहण्याचा  प्रयत्न  करा.
१४)  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.

#     आरोग्य   संदेश      #

पोट  राहूद्या  नियमित  साफ,
मुळव्याधीचा   चूकेल   व्याप.

काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल

1 डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण

काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.

2 एकाग्रता वाढायला मदत

काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.

3 हार्ट ऍटेकचा धोका कमी

काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.

4 वजन होतं कमी

नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं.

5 अस्थमा होतो बरा

काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.

6 कॅन्सरला रोखा

काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.

7 अपचन होत नाही

काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.

8 डोळ्यांसाठी गुणकारी

दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत.

9 सुरकुत्या होतात कमी

काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.

10 केस गळती थांबवायला मदत

काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.
शरीरावरील  काळे  डाग 

उपाय -----

१)  नियमित  प्राणायाम  करा.
२)  पचनशक्ती  स्ट्राँग  ठेवा.
३)  पोट  साफ  राहूद्या.
४)  पालेभाज्या  व  फळभाज्या  खा.
५)  सकाळी  ऊठल्यावर  तोंडातील  लाळ  सर्व  डागांवर  चोळून  लावा.  तोंड  धुण्यापूर्वीची  लाळ  पाहिजे.  हा  जबरदस्त  उपाय  आहे.
६)  कोरफड  पानातील  गर  लावा.
७)  आवळा  रस /  पदार्थ  घ्या.
८)  डागांवर  कच्च्या  पपईचा  रस  लावा.
९)  कडुलिंबाची  पाने  आंघोळीच्या  पाण्यात  टाकून  पाणी  उकळवून  घ्या.  नंतर  त्याच  पाण्याने  आंघोळ  करा.  मात्र  साबण  वापरू  नका.

     #     आरोग्य   संदेश     #

करा  योग,  पळतील  रोग. संपतील  भोग.
🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर यांच्या मते  आहाराविषयीच्या संकल्पना.

🍲 नियोजनबद्ध आहार कोणता?

आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.

🏃वाढलेली चरबी कशी कमी करावी?

आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.

🍇कोणती फळे खावीत?

आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

◆ मधुमेहासाठी आहार कसा असावा?

खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.

◆ शुगर-फ्रीचा वापर करावा का?

शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.

◆ वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?

वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.

● कडधान्य कशी खावीत..

आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

● जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?

शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.

🚫आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?

शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.

आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?

आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.

✌दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?

सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. जेवताना शक्यतो पाणि पिऊ नये,जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने पाणि प्यावे.त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.

🍚घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?

चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.

👨👩वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?

वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.

💧सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?

सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.

🍲साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?

प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा,

🙆केस, त्वचेसाठी काय सल्ला.

केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

🌞आपला दिवस कसा असतो?
मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.

✌दर दोन तासांनी खा

🍌फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा

🍲नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा

🍷जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या

🍎जेवणानंतर एखादे फळ खा

🍲संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात

😇 रात्री ८.३० च्या दरम्यान हलका आहार घ्या

हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.

🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर
आहारातून  उपचार

पुढील  आजार  झाल्यास  त्यांच्या  खाली  दिलेले  अन्नपदार्थ  खा.  आजार  लवकर  बरे  होतील.

१)  आम्लपित्त - 
काळी  मनुका,  आलं,  थंड  दुध,  आवळा, जिरे  खा.

२)  मलावरोध  -
पेरु,  पपई,  चोथा /  फायबरयुक्त  असलेले  अन्न,  दुध + पाणी,  कोमटपाणी ,  त्रिफळा  चूर्ण  घ्या.  पोटाचे  व्यायाम  करा,  टाँयलेटला  बसल्यावर  हनुवटी  प्रेस  करा.  लवकर  पोट  साफ  होते.

३)  हार्टअटैक / ब्लॉकेज -
लसूण,  कांदा,  आलं  खा.  रक्ताच्या  गाठी  होत  नाहीत.  रक्ताभिसरण  उत्तम  होते.

४)  डिसेन्टरी / जुलाब -
कापूर  +  गुळ  एकत्र  करून  खा.  त्यावर  पाणी  प्या.  लगेच  गुण  येतो.

५)  खोकला -
२ / ३   काळीमिरी  चोखा.  दिवसातून  तीन  वेळा.  खोकला  थांबतो.

६)  मुळव्याध -
नारळाची  शेंडी  जाळून  राख  ताकातून  दिवसातून  २ / ३  वेळा  घ्या.  चांगला  गुण  येतो.  रामदेव  बाबांचा  उपाय  आहे.

७)  दारूचे  व्यसन -
वारंवार  गरम  पाणी  प्या.  तसेच  दारू  पिण्याची  आठवण  येईल  त्यावेळी  जरूर  गरमच  पाणी  प्या.  २ / ३  महीन्यात  दारू  सुटेल.

८)  डोळे  येणे -
डोळ्यांना  गाईचे  तुप  लावा.  आराम  पडेल.  कापूर  जवळ  ठेवा.  संसर्ग  वाढणार  नाही.

९)  स्टोन -
पानफुटीची  पाने  खा.  कुळीथ  भाजी  खा.  भरपूर  पाणी  प्या. 

१०)  तारूण्यासाठी -
भाज्यांचा  रस,  आरोग्य  पेय,  फळे  खा. गव्हांकुराचा  रस,  Green  Tea  ,प्या.

    📢     आरोग्य  संदेश    🔔

संतुलित  आहारात  उपचार  आहेत  खरे,
सर्वच    आजार   नक्कीच   होतील बरे.
 

आर्टीकल जरा मोठे आहे पण जीवनावश्यक आहे

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏